Sunday, July 10, 2016

जरा विसावू या वळणावर ....

जरा विसावू या वळणावर .... 
भले बुरे जे घडून गेले... विसरून जाऊ सारे क्षणभर... जरा विसावू या वळणावर... या गाण्याच्या बोलाने आज सकाळी माझी झोपमोड झाली. अन्‌ वाटले... खरेच आयुष्यात आलेले अनुभव आणि आठवणी विसरण्यासारख्या असतात का? गीतकार सुधीर मोघे यांनी म्हटल्याप्रमाणे खरेच आपण कुठून येतो कळण्यापूर्वीच नकळत गुंतत जातो... हा गुंता सोडवता सोडवता आयुष्याची माध्यान्ह होते... आजच्या संगणकीय युगात तर सगळेच बनावट वाटावे असे... ट्विटर काय, फेसबूक काय अन्‌ वॉटस्‌अप काय.... सगळी नाती कामापुरती आणि गरजेपुरती. बऱ्याचदा समोर आल्यावरही ओळख नाही लागणार पण फेसबूकवर घट्ट मैत्री... तरीही आजची तरुणाई यात गुंतत चाललीय... का?, कशासाठी? माहीत नाही, पण असंच होतय हे मात्र खरं... आमचा गुंतण्याचा प्रश्‍न नाही... कारण आम्ही जपतो ती खरी आणि जीवंत नाती... सोशल नेटवर्क साईटवरची नव्हे... म्हणूनच जुन्या आठवणी आल्या की, आजच्या नाटकी नात्यांची चीड येते. असो... कधी ऊन तर कधी सावली... कधी चांदणे तर कधी काहिली... असे म्हणत आपणही सुधीर बाबुंप्रमाणे सारे गोड मानून घेऊ.. अन्‌ पुढे जाऊ...

No comments:

Post a Comment